चौफेर न्यूज – उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्राध्यापकांची नियुक्ती व पदोन्नतीसंबंधी नियमांत बुधवारी बदल केले. कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी असलेली एपीआय प्रणाली संपुष्टात आणली. २०२१- २२ पासून विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराने पीएचडी पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहेत. यापूर्वी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनाही ही नियुक्ती मिळत होती.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘आता २०२२ पासून विद्यापीठात फक्त पीएचडी धारकांनाच नियुक्ती मिळेल. प्राध्यापकांनी फक्त चांगल्या शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशाने ‘एपीआय’ प्रणाली बरखास्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.