पुणे : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. विशेष करून जन्मतारखेच्या वादावरुन अनेकदा पासपोर्ट मिळण्यास अडचणी येतात मात्र, परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे पासपोर्ट मिळणे अधिक सोपे होणार आहे.
जन्म तारखेच्या नियमतील बदल: पासपोर्ट नियम, 1980 नुसार, 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा या दिवसानंतर ज्यांचा जन्म झाला असेल, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणे बंधनकारक होतं. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार, परराष्ट्र खात्याने काही पर्याय दिले आहेत, ज्यामुळे जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.