प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन
महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक विचार देशासाठी प्रेरक ः प्राचार्य अतुल देवसाक्री ः महात्मा गांधीजींचे अहिंसात्मक विचार हे देशासाठी प्रेरक आहे. गांधीचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे पुस्तक आपल्याला दिशादर्शक ठरेल. तसेच त्यांचे देशासाठीचे योगदान हे अनन्यसाधारण असे आहे. महात्मा गांधींनी केलेली ही प्रतीके कृती आपल्या देशाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी होती. त्यांना अवलंबलेली अहिंसात्मक वृत्तीतून आपल्या सर्वांना मोठी शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अतुल देव यांनी गांधी जयंती कार्यक्रमाप्रसंगी केले. साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बुधवारी दि. 2 ऑक्टोबर गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या व शास्त्रीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्राचार्य देव म्हणाले की, गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खर्या भारताचे मूळ म्हणून पाहिले. स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ या नावाखाली प्रसिद्ध आहे. सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. परमेश्वर सत्य आहे. असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, सत्य (हेच) परमेश्वर आहे, असे मत प्राचार्या भारती पंजाबी यांनी व्यक्त केले. सर्वांनी गांधींच्या तत्वावर चालावे, असाही सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमधून रुतीका सूर्यवंशी इयत्ता 6वी, समीक्षा चव्हाण इयत्ता 3री, जयेश देसले इयता 8 वी आणि योगेंद्र जाधव इयत्ता 5वी यांनी भाषणे दिली. या कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बेडसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलख लेखन वैष्णवी थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.