साक्री – वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करण्यात येतो. विजय साजरा करण्यासाठी सर्व एकत्र येऊन विजयादशमी म्हणजेच दसरा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आपट्याची पाने सुवर्ण प्रतीक मानून ती एकमेकास देऊन व्याभिचारीक प्रवृत्तीवर मात करण्याकरीता रावणदहन केला जातो. परंतू, दरवर्षी आपण रावण जाळूनही आपल्या स्व: मधील वाईट प्रवृत्ती , वाईट दुर्गुण, एकमेकांचा तिरस्कार करणे कधीच जाळत नाही. किंबहुना ती दुरही करत नाही, असे मत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी व्यक्त केले
सोमवार दि.7 ऑक्टोबर रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विजयादशमी या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्री प्रायमरी स्कुलच्या प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी, प्री प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी नवदुर्गांचे रूप धारण करून महिषासुराचा वध ही छोटीशी प्रसंग मूकनाटिका सादर केली. त्याचप्रमाणे इयत्ता 3 ते 6 वी मधील काही विद्यार्थ्यांनी रामायणातील काही प्रसंग सादर केले. वैशाली पाटील यांनी विजयादशमीचे महत्व विदयार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर दुर्गामातेचे प्रतिमा पूजनकरून दांडिया रासाची सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. शेवटी प्रभू रामाच्या वेशभूषेत आलेल्या रामाने बाण मारून रावणाचे दहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन भुपेंद्र साळुंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक गोविल यांनी केले. छायाचित्रण नितीन राजपूत तर फलक लेखन वैष्णवी थोरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी रेखाटन करण्यात आले.