पिंपरी:- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही तथाकथित वामपंथी विद्यार्थ्यांकडून युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करण्यात आली. अशा देशविघातक समाजकंटकांविरोधात विहिंप, बजरंग दलच्या वतीने डॉ.डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज गेट समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे या घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे विद्यार्थी मंगेश नढे, गौरव पाटील, अभिजीत चव्हाण, प्रशांत सस्ते, समर्थ राऊत, विशाल वाघमारे, अजित घाडगे, ओमकार कुंभार, अक्षय इंदलकर, राहुल दुबे, निशांत शेवाळे, अवकाश यादव, अमर कुंभार, महेश जानकर, रमेश बटवाल, विनीत घाडगे तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने गौरव वाळुंजकर, ओंकार देशमुख, तेजस चवरे, संभाजी शेडगे, हृतिक चव्हाण, आदित्य कुलकर्णी व अन्य काही संघटना व कॉलेज मधील विद्यार्थ्यां मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
“स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची जेएनयूमध्ये झालेल्या विटंबनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अनेक युवकांचे प्रेंरणास्थान असलेले, चरित्रसंपन्न युगपुरुष स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतिचा प्रचार प्रसार साता समुद्रापार नेला, त्यांचा आपल्याच देशात असा अवमान व्हावा ही अत्यंत निंदनीय बाब आहे” अशी भावना मंगेश नढे यांनी व्यक्त केली.
जेएनयु विद्यापीठ येथील या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून भविष्यात या विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक हानी पोहोचून त्यांचे आयुष्य वाया जाऊ नये किंवा अशा अन्य कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नयेत, तसेच देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात यावे, याचा निषेध व्यक्त करून पोलीस प्रशासनाला तसे निवेदन ही देण्यात आले. हे निषेध आंदोलन शांततेत व राष्ट्रगीताने संपन्न झाला.