Chaupher News
नांदेड : तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टार सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. तसंच संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असंही अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते सचिन खेडेकरही उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, “तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत.”