Chaupher News
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन महिन्यात केवळ 15 हजार शतकऱ्यांची यादी लावली असून सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिलं आहे. ठाकरे सरकारकडून महिन्याला फक्त साडेसहा हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलं आहे. या गतीने कर्जमाफी दिली तर अनेक वर्षे कर्जमाफीसाठी लागतील असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. सभागृहाबाहेर आणि सभागृहातही भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर विरोधकांकडून विधानसभेचं कामकाजाला दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे.
आम्ही दिवसभराचे कामकाज आज बंद करतो आहे. आज भाजपचे धरणे आंदोलन सुरु होत आहे. शेतकाऱ्यांचे आणि महिलांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलन चालू ठेवणार असल्य़ाचं फडणवीसांनी सांगितलं. तसेचं आज संध्याकाळी विरोधक राज्यपालांना जाऊन भेट घेणार असल्य़ाची माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान महिला सुरक्षेवर स्थगन प्रस्ताव विरोधकांनी मांडला पण प्रचंड गोंधळातही सरकारनं कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं दिलेलं वचन पाळा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मागणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.