Chaupher News
मुंबई : आरक्षणप्रश्नी कोणत्याही प्रकारची आदळआपट करण्याची गरज नाही. मुस्लिम आरक्षण मुद्दा माझ्यासमोर मुद्दा आलेला नाही. त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही,जेव्हा सरकार समोर विषय येतील तेव्हा निर्णय घेऊ”, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत मुस्लिम आरक्षण अध्यादेश काढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळेच आता मुस्लिम आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे. तसेच 7 मार्चला मी अयोध्येला जात आहे. श्रीराम दर्शन घेणार असल्याचंही यांवेळी त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह अनेक विषयांवर महत्वपूर्ण वक्तव्य केली.