पिंपरी ः शहराची लोकसंख्या, दिवसें-दिवसं वाढणारा यंत्राचा वापर यामुळे इ-कचरा वाढत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे या इ कच-याची व्हिलेवाट लावयला कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन इ वेस्टबाबत उदासीन आहे, असा अरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आला आहे.पत्रकात म्हटले आहे की, 2004 सालापासून पर्यावरण संवर्धन समिती, नदी विकास मंच, इंद्रायणी बचाव कृती समिती सातत्याने इ- कचरा विघटणाची मागणी करत आहोत. मात्र कुदळवाडीतील भंगार व्यापा-यासोबत असलेल्या आर्थिक संबंधामुळे हा विषय बाजूला ठेवला जातोय. याची जाहीर कबुलीही पर्यावरण अहवालात पर्यावरण विभागाने दिलेली आहे.
शहरात आजमितीला एकही इ-कचरा संकलन केंद्र नाही. शहरात हातगाडीवाले रोज इ वेस्ट गोळा करतात. मात्र, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने विघटन न करता ते भट्टीत जाळले जाते जे की घातक आहे. जाळल्यानंतर त्यातून निघणा-या धुरामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास होतो. तशा तक्रारीही केलेल्या आहेत. त्याकडेही प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते. त्यामुळे आता इ- कच-याबाबत केवळ प्रशासनाला कारणीभूत न धरता प्रत्येक नागरिकाने इ-कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही पर्यावरण संवर्धन समितीतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.