चौफेर न्यूज – वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतलाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन या वर्गातील मुलांना परीक्षा न घेताच पास करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केलीय. विद्यार्थ्यांच्या जिवाला कुठलाही धोका उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कमी झालेलं कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतंय. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलंय. या पार्श्वभूमीवर तमिळनाडू राज्य सरकारनं काही महत्त्वपूूर्ण निर्णयांची घोषणा केलीय.
वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतलाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन या वर्गातील मुलांना परीक्षा न घेताच पास करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केलीय. विद्यार्थ्यांच्या जिवाला कुठलाही धोका उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.