चौफेर न्यूज – देशभरात शिक्षक म्हणुन नोकरी मिळविण्यासाठी पात्रता ठरणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी परीक्षा) निकाल जाहीर झाला आहे.देशस्तरावर होणारी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) यांच्या वतीने घेण्यात येणारी सदर परीक्षा नुकतीच ३१ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. देशभरातील ११२ शहरातील २९३५ केंद्रावर २३ लाख ५१ हजार ६२ विद्यार्थ्यानी यावर्षी परीक्षा दिली होती.
पहिल्या पेपर साठी १२ लाख ४७ हजार २१७ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ४ लाख १४ हजार ७९८ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या पेपर साठी ११ लाख ४ हजार ४५४ विध्यार्थी प्राविष्ठ झाले होते त्यापैकी २ लाख ३९ हजार ५०१ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसई बोर्डाने या परीक्षेसाठी राज्यात केवळ पाच शहरात परीक्षा केंद्र निश्चित केली होती. मुंबई सह औरंगाबाद, नागपुर, नाशिक, पुणे या पाच केंद्रावर ही परीक्षा झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग सह रत्नागीरी जिल्ह्यातील शिक्षक अहर्ता धारण केलेल्या विद्यार्थ्याना पुणे, मुंबई सह जवळच्या गोवा राज्यातील परीक्षा केंद्र निवडावे लागले होते. विद्यार्थ्यांच्या या गैरसोईचा विचार करुन बोर्डाने प्रत्येक जिल्ह्यात निदान एक केंद्र मंजुर करण्याची मागणी परीक्षार्थींमधुन होत आहे. विध्यार्थ्यांना गुणपत्रके त्यांच्या लॉगिन मधून डाऊनलोड करता येणार आहेत.