चौफेर न्यूज – राज्यात कोरोना कहर हा अत्यंत भयावह परिस्थिती आहे. त्यात बारावीची लेखी परीक्षा ही काही दिवसांवर येऊन ठेपली असताना या परीक्षा पुढे ढकलण्याचा अथवा त्यासाठी इतर पर्याय देण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाकडून घेतला जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊ दहावी बारावीच्या परीक्षा सोबत विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी इंडिया वर्ल्ड पॅरेण्ट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाव्यात अशी मागणी राज्यातील विद्यार्थी मागील महिनाभरापासून करत आहेत त्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलनेही करण्यात आली परंतु त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही मात्र आता देशातील इतर राज्यांनी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून तसेच त्यांना घरी इतर काही अभ्यासक्रम देऊन त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला सूचना द्याव्यात अशी मागणी असोसिएशनच्या एडवोकेट अनुभा सहाय्याने केली आहे.
राज्यात कोरोना परिस्थिती भयंकरच आहे रोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक आणि असंख्य कुटुंबे करोना मुळे बाधित होत आहेत अशा स्थितीमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ही जीवाशी खेळण्याचा प्रकार होईल त्यामुळे याविषयी तात्काळ निर्णय होणे अपेक्षित होते परंतु शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून याविषयी कोणताही निर्णय अद्याप घेतला गेला नाही त्यासाठी अजूनही टाळाटाळ केली जाते म्हणून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी दहावी-बारावीच्या परीक्षा सोबतच महाविद्यालयातील परीक्षाही विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासक्रम आणि विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक अथवा सराव परीक्षा यांचेअंतर्गत मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घ्यावा यासाठी केंद्र सरकारने सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे.