पिंपरी :- आपण वर्षभर उपक्रम राबवले तरी दिवस कमीच पडतील इतके महान कार्य सावित्रीबाई फुलेंनी केले आहे. त्या काळात त्यांनी महिला सबलीकरणाची चळवळ उभी केल्याने आज महिला उच्च पदावर कार्यरत असल्याचे पहायला मिळत आहे. यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला. आज सावित्रीबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्राप्त या समाजातील आदर्शवत महिला आहेत असे गौरवोद्गार सहकार व इतर मागास व विशेष मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काढले. महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवडच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ महिलांचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार-२३” देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील कै.प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उद्योजक दीपकनाना कुदळे, पिंपरी चिंचवड सीए इंस्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय सातव, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, संगीता ताम्हणे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, मोहन भूमकर, रेखा दर्शिले, धनंजय वर्णेकर, गणेश दळवी, समिता गोरे, उद्योजक संजय जगताप, भरत आल्हाट, दिशा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजू कर्पे, प्रशांत डोके, करमोळीचे सरपंच शरद केदारी, मीना माळी, चित्रपट निर्माते निवृत्ती बोराटे, वंदना जाधव, सोनम जांभूळकर, काळूराम गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे श्रीमती अंजना जमदाडे-(आदर्श माता), श्रीमती प्रमिला टिळेकर (आदर्श माता), सुरैय्या सिकंदर शेख फातिमा – (सावित्री पुरस्कार), श्री गुरुमाँ मधु गोस्वामी, (राज्यस्तरीय – आध्यात्म भूषण पुरस्कार), सुनिता राऊत (राज्यस्तरीय कृषी भूषण), मधुरा भेलके (राज्यस्तरीय समाज भूषण), मंजिरीताई धाडगे (राज्यस्तरीय समाज भूषण), विजया गारुडकर – (राज्यस्तरीय उद्योगभूषण), निशा बेलसरे (शिक्षण भूषण पुरस्कार), प्राजक्ता रुद्रवार (शिक्षक भूषणपुरस्कार), प्रमिला गोरे (आदर्श शिक्षिका), पोलिस निरीक्षक सुचेता खोकले (कर्तव्य भूषण पुरस्कार), वर्षा कांबळे (पत्रकार भूषण पुरस्कार), आशा कांबळे (समाज भूषण), माधुरी कोले (समाज भूषण), रोहिणी रासकर (समाज भूषण), कु. रिद्धी गायकवाड (क्रीडा भूषणपुरस्कार), तृप्ती रामाणे (व्यवसाय भूषण) अश्विनी दर्शले (व्यवसाय भूषण), श्रद्धा कातळे (कला भूषण), सुनिताराजे पवार (साहित्य भूषण पुरस्कार) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हनुमंत माळी यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण, पौर्णिमा कोल्हे यांनी केले. तर आभार महादेव भुजबळ यांनी मानले.
- श्री सावे पुढे म्हणाले कि, स्व. प्रमोद महाजन सांगायचे कि संगणक साक्षरता झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. संगणक किंवा मोबाईलमुळे हायटेक झाले पाहिजेत. मात्र आधुनिक युगात हायटेक होताना आपली हिंदू संस्कृती आणि आईवडिलांना विसरू नका. माळी समाज हा शेती करणारा लाजाळू आहे. मात्र आज शांत आणि लाजाळू राहून चालणार नाही तर इतर समाजासारखे माळी समाज आक्रमक बनला पाहिजेत.तरुणांनी स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष दिले पाहिजेत असा सल्ला दिला.
ओबीसींसाठी शासनाच्या भरपूर असलेल्या सुविधांचा लाभ घेतला पाहिजेत. ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील ३ वर्षांत ७२ वसतीगृह निर्माण करीत आहोत. विदर्भात ५ ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेवून सुरू करायचे नियोजन आहे. ६०% मुलींच्या तर ४०% मुलांच्या वसतिगृहासाठी केंद्र सरकारचे अनुदान मिळणार आहे.पूर्वी चारशे विद्यार्थ्यांना पीएचडी साठी शिष्यवृत्ती दिली जायची आज १२३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.पूर्वी २०० स्पर्धा परिक्षाच्या विद्यार्थ्यांना आज १५०० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने पायलट ट्रेनिंग कोर्सची घोषणा केली होती. मात्र ती आम्ही अंमलात आणली. दरवर्षी २० पायलट घडतील. ज्या कोर्सेसची वार्षिक फि ४०/५० लाख आहे. हि फि सरकार भरेल. पुढील वर्षी १० जागा मुलींसाठी राखीव ठेवणार आहोत. परदेशातील शिष्यवृत्ती १० विद्यार्थ्यांवरून ५० पर्यंत मर्यादा वाढवली आहे. ५० विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतील.
डॉ.भुजबळ म्हणाले कि, देशाला अभिमान वाटावा असे महा युगपुरुष लाभले. १८४८ च्या कालखंडात न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचा जन्माअगोदर महात्मा फुलेंनी समाज प्रवाह विरोधात जावून स्वकीय व परकीयांच्या चाली- रुढी, परंपरेच्या लढा दिला.
कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, सचिव विश्वास राऊत, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, खजिनदार सूर्यकांत ताम्हाणे, उपाध्यक्ष नरहरी शेवते, श्रीहरी हराळे, अमर ताजणे, वैजनाथ माळी, प्रदीप दर्शले, नवनाथ कुदळे, नितीन ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ, अलका ताम्हाणे, स्मिता माळी, कुंदा यादव, संगीता माळी, उर्मिला करपे आदिंनी नियोजन केले आहे.