उमेदवारी कायम ठेवल्यानंतर राहुल कलाटे यांची पहिली प्रतिक्रिया
पिंपरी :- मागीलवेळी मला १ लाख १२ हजार मते मिळाली. त्यावेळी लोकांच्या मनात वेगळी भावना होती. भाजपची प्रचंड मोठी लाट, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा लोकांवर दबाव होता. केंद्र, राज्य, महापालिकेत भाजपची सत्ता होती. असे असतानाही मतदार माझ्यासाठी बाहेर आले. पोटनिवडणूक लढविण्यासाठी माझ्या मागे मतदारांचा रेटा होता. नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही आमचा अनादर करु नका असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. चिंचवडच्या जनतेचे आदर करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे जनतेची लोकभावना, जनतेच्या पाठिब्यांवर मी निवडणुकीला सामोरे जात असल्याचे कलाटे यांनी सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान कायम राहणार की, माघार घेणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कलाटे यांच्या मनधरणीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवले होते. मात्र कलाटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. जनतेची लोकभावना व पाठींब्यामुळेच ही निवडणूक लढवत असल्याचे मत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.
उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे माझ्याशी काही गोष्टी बोलले. काही जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली. त्यांच्याबाबत मी आदर व्यक्त करतो. परंतु, आपण मागचे काही दिवस मी लढावे यासाठी मला चिंचवडच्या लोकांचे रेटा होता.