प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे आषाढी एकादशीनिमीत्त दिंडी सोहळा साजरा
साक्री : “ विठ्ठल…विठ्ठल… जय हरी विठ्ठल” अशा विठू नामाच्या जयघोषात अवघी साक्री नगरी दुमदूमनं निघाली. आषाढी एकादशीनिमीत्त येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. दिंडी सोहळ्याने साक्री न्हावून निघाली.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी सोहळयाची सुरुवात शाळेच्या आवारातून झाली. शाळेतील इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणातून भाविकांचे लक्ष वेधले. शाळेतील इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणातून भाविकांचे लक्ष वेधले. दिंडी सोहळयात वारकरी संप्रदायाने मोठया संख्येने सहभाग घेतला. ‘बोलावा विठ्ठल… पहावा विठ्ठल…’ ही यंदाच्या कार्यक्रमाची थीम होती. विविध छटांनी आजच्या संपूर्ण दिवसाचे नियोजन होते. “विठ्ठल, विठ्ठल” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मुला-मुलींनी सुंदर वेशभूषा करून वारकऱ्यांचा वेश परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माउलींच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. जून महिना आला की वारकऱ्यांना आस लागते ती आषाढी एकादशीची. एक महिन्यांचा पायी प्रवास करत वारकरी विठू नामाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला जातात. दरवर्षी साक्री तालुक्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीला जात असतात. अनेक गावांतून हजारो वारकरी दिंड्यांमध्ये सामील होत असतात. याची देही याची डोळा विठूरायाचे सावळे रूप पाहण्याची आतुरता वारकऱ्यांना लागलेली असते.
विठ्ठल – रखुमाईच्या पूजनाने कार्यक्रमाची सूरूवात…
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापिका वैशाली लाडे यांनी वारीचे दीपप्रज्वलन केले. सुंदर फुलांनी सजवलेली दिंडी आणि विठ्ठलाची मूर्ती पूजा करण्यासाठी आली. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल पासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी माऊलींच्या गाण्याने आणि आरत्यांच्या उत्साहात भारावून गेले.
लेझीम नृत्याचे आकर्षण…
शहरातील बसस्थानक व बाजारपेठ या मार्गावरून दिंडी सोहळा निघाला असताना सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या रांगेकडे सर्वांचे लक्ष वेधले. वारीमध्ये सुंदर अभिनय, लेझीम नृत्य तसेच पिरॅमिड नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वारकरी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिस्त आणि वर्तनाबद्दल अनेक रहिवासी आणि पालकांनी कौतुक केले.
नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग…
पालखी ही १००० वर्ष जुनी परंपरा आहे. ज्याचे पालन करणारे वारकरी, लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही साक्रीतील दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचा समूह एकत्र येऊन, गाणे, नृत्य आणि ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष करून लोकांना हा उत्सव साजरा केला. यावेळी साक्री परिसरात मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले.
टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत
पालखी सोहळा गावाच्या दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले, वैष्णवांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण तयार झाले. पालखी सोहळ्यात टाळ – मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, कपाळी गंध, मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या शेकडो वारकऱ्यांसह ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने जपली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. याचाच प्रत्येय साक्रीकरांना अनुभवता यावा म्हणून प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने दरवर्षी दिंडी सोहळयाचे आयोजन करून वारकरी संप्रदायाचा वारसा जतन केला जातो.
वारीला अनन्यसाधारण महत्व…
वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. असे म्हंटले जाते कि, या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते.
हजारो दिंडया जातात पंढरपुरात…
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधारानीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते, हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपालकाला असेही म्हणतात.