मुंबई– केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलेपासून शेतकऱ्यांसाठी या सरकारने महत्त्वाची योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना चार महिन्यात दोन हजार म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान योजनेतून मिळतात. परंतू आता यावर आळा बसण्याची शक्यता आहे. कारण राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
- परंतु, अजूनही १४.८७ लाख शेतकऱ्यांचे आधार लिंक झाले नसल्याने हे शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळं आगामी काळात याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही, असं बोललं जात आहे.
- दरम्यान, “प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ हाती घेतली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जात असून यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते पाडण्यात आले आहेत. यासाठी बँक खात्याशी आधार सलग्न असणे गरजेचे आहे. यानुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आपले सरकार सेवा केंद्रावर आधार कार्डसाठी गेलेल्या ज्येष्ठ लाभार्थींंमध्ये कोणाचे डोळे मॅच होईनात तर काही शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने कृषी खातेही हतबल झाले आहे.
लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याच्या सूचना
शासनाने डिसेंबर-मार्च २०२२ या कालावधीतील १३ व्या हप्त्याचे वितरणाचे नियोजन करण्यासाठी गेल्या २ डिसेंबर रोजी बैठक बोलावली होती. यावेळी राज्यातील सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी १५ डिसेंबरची मुदत होती. केंद्र शासनाच्या पत्रातील निर्देशाप्रमाणे प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थीची बँक खाती गेल्या १५ जुलैपर्यंत आधार संलग्न करण्यासाठी कृषि आयुक्तालयाने सूचित केले होते. मात्र त्यानंतरही १४.८७ लाख लाभार्थींची बँक खाती अद्यापही आधार सलग्न करणे प्रलंबित आहेत.