भ्रष्ट लोकांना घरी बसविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते काम करतील…..लक्ष्मण जगताप
पिंपरी (दि. 09 जानेवारी 2017) अविकसित, मागासलेला, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा मराठवाडा अशी ओळख मागील पंधरा वर्षात आघाडी सरकारने दिली. ते पुसण्याचे काम भाजपा सरकार करेल. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाचा संकल्प केला आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात विशेष आर्थिक तरतूद केली आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रहाटणी येथे दिली.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने रविवारी (दि. 08 जानेवारी) रहाटणी विमल गार्डन येथे मराठवाडा स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकूर बोलत होते. आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप मेळाव्याचे अध्यक्ष होते. यावेळी समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष मनोज तोरडमल, पांडूरंग धोमडे, शशीकांत दुधारे, भागवत शिंदे, संजय सुर्यवंशी, आशा पवार, संजय माळेकर, अरुण पवार आदी उपस्थित होते.
ठाकूर पुढे म्हणाले की, 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतात विलीन झाला. त्यानंतर विनाशर्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी बहुसंख्य जनतेने कौल दिला. मराठवाड्यातील नागरिक मेहनती आणि कष्टाळू आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात धाराशीव, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने शेती, उद्योग, औद्योगिक, वीज, रस्ते विकास याकडे लक्ष दिले नाही. वीजेवर सर्वात कमी खर्च केल्यामुळे दरडोई उत्पन्नात मराठवाडा कायम मागे राहिला. अजूनही मराठवाड्यात पाणी व वीजेअभावी रोजगार नाही. मराठवाडयातून लाखों लोक विस्थापित होऊन देशभर विखुरले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा मराठवाडा हि ओळख पुसून मराठवाड्याचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. असे ठाकूर यांनी सांगितले.
मेळाव्याचे उद्घाटक आ. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले की, केंद्र आणि राज्यात युतीचे सरकार आहे. शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेत देखिल भाजपाची सत्ता यायला हवी. मराठवाडा म्हटले की स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता यावी हे मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मराठवाड्यातून शहरात स्थायिक झालेले एक लाख नागरिक भाजपाच्या मागे उभे राहतील असा मला विश्वास आहे. मराठवाड्याचे प्रतिनिधीत्व महापालिकेत वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करु. मागील काळात पीसीएमसीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. झालेल्या खर्चाच्या प्रमाणात नागरीकांना त्यांच्या भ्रष्टाचारामुळे सुविधा मिळाल्या नाहीत. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरीत विकास झाला नाही. हॉकर्स झोन आणि भाजी मंडई अभावी शहरातील पदपथ पथारी आणि हातगाडीवाल्यांनी बळकाविले आहेत. 96 सालाचा विकास आराखडा मंजूर करायला आघाडी सरकारला तेरा वर्षे लागली. यातून त्यांच्या कामाची पध्दत लक्षात येते. राष्ट्रवादीच्या या भ्रष्ट लोकांना घरी बसविण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील. असेहि जगताप यांनी सांगितले.
समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे यांनी देखिल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मराठवाड्यातील सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प….. आ. सुजितसिंह ठाकूर
-
Previous
भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठेभांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय…..सचिन साठे