मुंबई : राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरु असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही फडणवीस यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आज (शनिवारी) सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतल असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस व पवार यांचे अभिनंदन केले आहे.