चौफेर न्यूज – लॉकडाऊनमुळे शाळा ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जबरदस्ती करू नये असा शासन निर्णय आहे. या कालावधीमध्ये शाळा जरी सुरू होणार नसतील तरी काही पालकांना पाल्याचे प्रवेश निश्चितीसाठी फी भरा असे फोन करण्यात येत आहेत. यामुळे पालकवर्ग त्रस्त असून केल्यास त्यांच्यावर कारवाई सध्या शाळाच सुरू नाहीत तर फी कशी भरायची? असा प्रतिप्रश्नपालकांकडून विचारला जात आहे. फी भरण्यासाठी पालकांना बंधनकारक करायचे नाही.फीकोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने १५ जुलैपासून शाळा आनलाईन सुरू च्या नावाने मुलाला शाळेतून कमी करता येणार नाही करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
शाळा प्रत्यक्षात जरी सुरू नसल्यातरी काही शाळा आनलाईन पद्धतीने सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आनलाईन शिक्षण सुरू आहे म्हणून पालक स्टेशनरी घ्यावी, शाळेची फी भरावी असे म्हणत आहेत. शाळांनी चालू शैक्षणिक वर्षाची फी मागू नये, जर फी भरायची असेल तर चार हप्त्यामध्ये फी भरण्याची सोय करून द्यावी, असे आदेश प्रशासनाने शाळांना दिले आहेत; पण तरीही काही शाळा मनमानी पद्धतीने पालकांना फी भरण्यासाठी दबाव आणत आहेत. मागील तीन महिन्यांपासून अनेक पालकांचे रोजगार बंद होते. सध्या मुले ही घरीच आहेत तर फी का भरायची असा प्रतिप्रश्न पालक करत आहेत. अन्यथा शाळेवर कारवाई करू! सध्या कोणत्याही शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती करू नये असा शासन निर्णय आहे आणि फी भरण्यासाठी पालकांना बंधनकारक करायचे नाही.फी च्या नावाने मुलाला शाळेतून कमी करता येणार नाही. विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.