चौफेर न्यूज – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई-एनईईटी परीक्षा सुरक्षित बनविण्यासाठी आणि उमेदवारांची भीती कमी करण्यासाठी मंगळवारी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्याअंतर्गत परीक्षा केंद्रे वाढविण्यात आली आहेत. यामुळे एक शिफ्ट आणि वर्गातील उमेदवारांची संख्या कमी होईल. जेईई मेन्स ही संगणक आधारित चाचणी आहे, तर नीट लेखी आहे. त्याचबरोबर एनटीए आणि शिक्षण मंत्रालयानेही स्पष्ट केले की, सप्टेंबरमध्ये त्यांच्या निर्धारित वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहेत. जेईई अॅडमिट कार्ड दिली गेली आहेत आणि विद्यार्थ्यांनी डाउनलोड देखील केली आहे. नीट अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गोंधळामध्ये राहू नये. एनटीएने 99% विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पहिल्या प्राथमिकतेचे परीक्षा केंद्र सुनिश्चित केले आहे. जेईई मेनसाठी 8.58 लाख आणि नीटसाठी 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
जेईई आणि नीटसंदर्भातील जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –
– नीट परीक्षेदरम्यान 24 ऐवजी 12 उमेदवार वर्गात बसतील.
– नीट परीक्षा केंद्रे 2546 वरुन 3843 करण्यात आली आहेत.
– जेईई परीक्षेची शिफ्ट 8 वरून 12 व परीक्षा केंद्रे 570 वरून 660 करण्यात आली आहेत.
– जेईईमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक जागा सोडून बसविण्यात येईल.
– जेईईच्या एका शिफ्टमध्ये एक लाख 32 हजार ऐवजी 85 हजार उमेदवार बसतील. दरम्यान, सीटिंग प्लॅनही बदलण्यात आला आहे.
– उमेदवारांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखून ठेवावे लागेल.
– ज्या विद्यार्थ्यांचे शरीराचे तापमान 99.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त आहे, त्यांना आयसोलेशन रूममध्ये नेले जाईल. ते तेथे बसून परीक्षा देतील.
– फ्रिस्किंग, कागदपत्रांची पडताळणी नोंदणी कक्षात केली जाईल.
– परीक्षा केंद्रात उमेदवारांना नवीन मास्क देण्यात येईल. परीक्षा केंद्रात प्रवेश पत्र, आयडी प्रूफ, फक्त पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर यांना परवानगी देण्यात येणार आहे.
– विद्यार्थ्यांना परीक्षा देताना मास्क घालणे आणि ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक होणार नाही.
– प्रत्येक उमेदवाराला सेल्फ डिक्लरेशन द्वारे लागेल की, तो कोरोना पॉझिटिव्ह नाही किंवा कोरोना पेशंटच्या संपर्कात आला नाही.
सामाजिक अंतरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
एनटीएने म्हटले आहे की परीक्षेच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रवेश व बाहेर जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार एकत्र प्रवेश करणार नाहीत किंवा त्यांना एकाचवेळी परीक्षा हॉल सोडू देणार नाही. सामाजिक अंतराबाबत उमेदवारांच्या काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एखाद्याला परीक्षा केंद्राबाहेर थांबायचे असेल तर त्या काळातही सामाजिक अंतर कायम राहील.
NTA ने राज्यांना व्यवस्था करण्यास सांगितले