चौफेर न्यूज
– कोरोनामुळे देशातील शिक्षण व्यवस्था बदलून गेली. तंत्रज्ञानाने शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल केले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी तंत्रस्नेही झाले. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणात कधीही तंत्रज्ञानाचा वापर केला नाही, असे विद्यार्थी थेट ऑनलाईन अभ्यास करताना दिसतात.
कोरोनामुळे शिक्षणपद्धतीत फार मोठा बदल झाला. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सरकारने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाने मुलांना ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय घेतला. बहुतांश मुलाकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नाही. ऑनलाईन शिक्षण मुलांच्या लक्षात राहत नाही. काही मुलांनी आत्महत्या पण केल्या. येत्या काही काळात शिक्षण क्षेत्रात फार मोठे आमूलाग्र बदल होतील.
शिक्षण म्हटल की शिक्षक, वर्ग, फळा, पेन, पुस्तक, वही, नियोजिक वेळ अस दृष्य विद्यार्थ्यासमोर येते, मात्र कोरोनमुळे ही संपुर्ण शिक्षण पद्धतीच बदलून गेली. आता शाळा, महाविद्यालयात जाण्याची गरज राहिली नाही. घरी बसून किंवा इतर ठिकाणी राहूनही शिक्षण घेण्याची सोय तंत्रज्ञानामुळे विकसीत झाली. ही बदलाची सुरुवात आहे आणखी अमुलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेत होतील. कोणत्याही विषयात दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण झाले तरी दुससऱ्या शाखेत शिक्षण्याती संधी भविष्यात विद्यार्थ्यांना मिळावी. उदा. आर्टच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे शिक्षण घेण्याची संधी भविष्यात निर्माण व्हावी.