चौफेर न्यूज – दहावी-बारावीच्या परीक्षेला 17 नंबरचा अर्ज भरून बाहेरून बसणाऱया विद्यार्थ्यांची यंदा फरफट होत आहे. एका केंद्रातून फक्त 50 विद्यार्थ्यांचेच 17 नंबरचे अर्ज भरून घेण्याची अट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घातली आहे. त्यामुळे 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्यास केंद्रचालक नकार देत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळ सांगेल त्या केंद्रावर जाऊन 17 नंबरचा अर्ज भरावा लागत आहे. आसनगावच्या एका विद्यार्थ्याला ठाण्यातील केंद्रावर जाऊन परीक्षा अर्ज भरावा लागला, तर मुंबई शहरात राहणारे विद्यार्थी उपनगरात येऊन परीक्षा अर्ज भरत आहेत. या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रही ज्या ठिकाणाहून अर्ज भरला आहे तेथीलच देण्यात येणार आहे.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजमधून परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. पण 17 नंबरचा अर्ज करणारे तसेच रात्रशाळांमधील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत कशी लागू होणार आहे याविषयी शिक्षण मंडळाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. 17 नंबरचा अर्ज करणारे विद्यार्थी कोणत्याही शाळा-ज्युनियर कॉलेजशी संबंधित नसतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र कोणते देणार, असा सवाल विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. शिक्षक भारतीचे कार्यवाह सुभाष मोरे यांनी सांगितले, ’17 नंबरच्या बऱयाच विद्यार्थ्यांनी घरापासून दूर असलेल्या पेंद्रावर जाऊन परीक्षा अर्ज भरलेल्यांना परीक्षा केंद्रही दूरवरचे येण्याची शक्यता आहे. बोर्डाने या विद्यार्थ्यांना घराजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची सूट द्यायला हवी.’ याप्रकरणी बोर्डाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
अर्ज भरण्यास 11 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
दहावी – बारावीचा 17 नंबरचा अर्ज भरण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे . प्रतिदिन 20 रुपये अतिविलंब शुल्क आकारून विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत . दहावीच्या http://form17.mh-ssc.ac.in विद्यार्थ्यांनी या तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचे आहेत .