चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्यात कोरोनाने भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण ऑनलाईन होत आहेत. राज्यातील परिस्थिती गंभीर बनल्यामुळे वैद्यकीय परीक्षांबाबत पण निर्णय घ्यावा लागणार आहे. वैद्यकीय मंत्री अनिल देशमुख हे याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंतिम वर्षाचे परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षांबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.त्यामुळे आता बाकीच्या परीक्षांबाबत पण निर्णय देणार असल्याचे समजले आहे.महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे १९ एप्रिलपासून परीक्षा होणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता परीक्षांच्या बाबतीत काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.
लॉकडाऊन लावल्यामुळे बाहेरील परिस्थिती खूप गंभीर बनणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही यावेळी मंत्री देशमुख म्हटले आहेत. अंतिम वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवर होतील. मात्र द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा वेळेवर होतील का याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.