चौफेर न्यूज – आयआयटी-गोव्याच्या (Goa-IIT’s) विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या एका प्रश्नपत्रिकेत स्वतःचे प्रश्न स्वतःच तयार करुन त्याची उत्तरेही दिली आणि नंतर ती ऑनलाईन (Online) व्हायरल केली आहेत. ज्यामुळे याला जगभरातील नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात व्हाईटक्रॅक करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिक वर्तुळात देखील याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये 70 गुणांचे पेपर फक्त दोन प्रश्नांमध्ये विभागण्यात आले.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या (Lecture) आधारे प्रश्नांची मांडणी करण्यात आली होती. ज्यात विद्यार्थांच्या आभ्यासक्रमाशी संबंधीत दोन प्रश्न, विचारण्यात आले. याची उत्तरे दोन तासांत देण्यास सांगण्यात आले. पहिला प्रश्न 40 गुणांसाठी तर दुसरा 30 गुणांसाठी असे 70 गुणांच्या पेपरमध्ये फक्त दोन प्रश्न विचारण्यात आले. उत्तरे लिहीत असताना मित्रांशी चर्चाकरुन लिहू नका. तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या उत्तरांमध्ये समानता आढळल्यास तुमचे गुण कमी होऊ शकतात. असे सांगण्यात आले.
11मे च्या या प्रश्नपत्रिकेवर द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकीच्या (Engineering) काही विद्यार्थ्यांनी याची प्रशंसा केली तर काहींनी यावर टीकेची झोड उठवली आहे. यावर टीका करताना विद्यार्थी म्हणाले, “गोव्यातील आयआयटीला विद्यार्थांच्या भविष्याची काळजी नाही, त्यांना नेहमीच ‘chill out’ राहण्यास आवडते. अशी टीका इंडिया डायस्पोरा ग्रुपकडून (India diaspora group) करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या टिकेच्या या पोस्टला 6,500 हून अधिक पसंती मिळाल्या आहेत. तर काहींचा असा विश्वास आहे की ही परीक्षा “विद्यार्थ्यांची क्षमता समजण्याचा एक चांगला मार्ग आहे”.
“अरे, काय ही परीक्षा!” असे राजन कर्णने सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले आहे. ‘तुम्ही स्वत: साठी प्रश्न तयार करता आणि त्याला उत्तर देता हा अनोखा मार्ग आयआयटी-गोव्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी शोधला आहे. ही खरी सचोटीची परीक्षा असेल. ‘
दरम्यान, या परीक्षेतील काही विषयांच्या पेपरला आयआयटीच्याच काही सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आयआयटीने या विषयांचे पेपर पुढील तपासणीसाठी सिनेट समितीकडे पाठविले आहेत. ही समिती या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेईल आणि लवकरच आपला अहवाल आयआयटीच्या संचालकांसमोर सादर करेल. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
आयआयटी-गोव्याचे संचालक प्रो. बी. के. मिश्रा म्हणाले, हा अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल. पण व्यक्तीशः मला ही प्रश्नपत्रिका नाही तर एक “कादंबरी” वाटत आहे. एक संचालक म्हणून मी माझ्या प्राध्यापकांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यात कधीच हस्तक्षेप केला नाही. फक्त यात एक गोष्ट महत्त्वची आहे, की पदवीधर विद्यार्थ्यांकरिता कशी व्यवस्था आहे, हे पाहणे आवश्यक आहे. कारण अशा प्रश्नपत्रिकेद्वरे पदवीधर विद्यार्थांच्या परीक्षा घेऊन त्यांना पदवी देणे आवघड आहे. जेव्हा विद्यार्थी इतके कष्ट करत असतात तेव्हा त्यांचे मूल्यांकन करण्याचे नवीन मार्ग शोधणे आवश्यक आहेत. त्यामुळे अशी परीक्षा म्हणजे मला ही कादंबरी मिळाल्या सारखे वाटत आहे. विद्यार्थी याबद्दल सकारात्मक आहेत, व्यावसायिक वर्तुळात अशी पध्दती एक वेगळेपणा निर्माण करणारी आहे. संपूर्ण महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कसे वाटते हे पाहण्यासाठी एक कोर्स शिकविण्याचे आम्ही ठरविले आहे. सध्या विद्यार्थी प्रचंड ताणावात आहेत. आशातच त्यांना तीन तासांच्या परीक्षा देण्यास भाग पाडणे योग्य होणार नाही.