चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर जमा केलेले परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेत ठोस कारण नसल्याचे नमूद करीत राज्यातील माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी केली होती परंतु ऐनवेळी कोरोना संकट उद्भवल्याने तयारीवर केलेला सर्व खर्च वाया गेल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करणे हितावह नाही, असेही म्हटले.
दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर जमा केलेले परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेत ठोस कारण नसल्याचे नमूद करीत राज्यातील माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी केली होती परंतु ऐनवेळी कोरोना संकट उद्भवल्याने तयारीवर केलेला सर्व खर्च वाया गेल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करणे हितावह नाही, असेही म्हटले.
काही पालकांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका सादर केली होती. त्या याचिकेवरून हायकोर्टाने महाराष्ट्र बोर्डला परीक्षा शुल्क परत घेण्याच्या अर्जावर विचार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बोर्डने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेची दखल घेत सुप्रीम कोर्टाने राज्यातील शिक्षण मंडळ व परीक्षा बोर्डकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त होताच याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.