चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन स्कूलच्या प्राचार्या सौ .भारती पंजाबी मॅम ,सौ. वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर व श्री तुषार देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अश्विनी पाटील हिने लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी माहिती देताना सांगितले की केशरी व मराठा हे वृत्तपत्र लिहिली. इयत्ता नववीतील विद्यार्थी जयदीप बेहेरे याने माहिती देताना सांगितले की टिळकांनी मंडाले तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. डेक्कन कॉलेज मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ऋतुजा खैरनार या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळकांच्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या व निहारिका बोरसे या पाचवीतील विद्यार्थिनीने लोकमान्य टिळकांच्या संपूर्ण जीवन परिचय देताना सांगितले की राष्ट्रीय एकता व अखंडता राहण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. असे आपल्या भाषणातून व्यक्त केले .याप्रसंगी पुष्पराज पवार या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांची वेशभूषा धारण करून लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध घोषवाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी ऋतिका सूर्यवंशी हिने केले.