Chaupher News
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले असून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. दोन महिन्यात फक्त १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ४०० महिने लागतील” असं गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. दरम्यान आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. ज्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.