चौफेर न्यूज – बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सप्टेंबर पासून ११ वी चे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जुलै महिण्यात दहावीचा निकाल लागणार असून यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करुन अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही तिथे विद्यार्थ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.