चौफेर न्यूज – तुम्ही PHD करत असाल किंवा PHD करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हालाही दिलासा देणारी ठरू शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाने PHDच्या नियमांमध्ये बदल करून रिसर्च पेपर ची आवश्यकता रद्द केली आहे. आतापर्यंत PHD साठी UGC चा नियम असा होता की, M.Phil विद्वानांना एक रिसर्च पेपर सादर करणे बंधनकारक होते. तर पीएचडी विद्वानांना प्रबंध सादर करण्यापूर्वी किमान 2 रिसर्च पेपर कॉन्फरन्स किंवा सेमिनारमध्ये सादर करावे लागतील. याशिवाय, संदर्भित जर्नलमध्ये एक रिसर्च पेपर प्रकाशित करणे देखील आवश्यक होते.
UGC ने ugc.ac.in या संकेतस्थळावर या संदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. PHDचा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये Show Research Paper प्रकाशित करणे आता बंधनकारक नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. PHDमध्ये रिसर्च पेपर ची अट दूर करण्यात आली आहे.
Reserch Paper नियम का बदलला?
पीएचडी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करून, आम्ही ‘वन साइज फिट्स ऑल’ हा दृष्टिकोन आवश्यक नाही यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्याशाखा/ विषयांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यांचा (UGC Rules for PHD) दृष्टिकोन समान असणे आवश्यक नाही.