चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीच्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाऊन बोर्डाचा पेपर द्यावा लागणार आहे. सध्या ऑनलाईन परीक्षेस बोर्ड अनुकुल नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न असल्याचे बोर्डाचे मत आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.