चौफेर न्यूज – आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक होते आणि त्यांना मुलांच्या शिक्षणासोबतच संस्काराचे महत्त्व चांगलेच माहीत होते.
- खोटे बोलण्याच्या सवयीकडे करू नका दुर्लक्ष
चाणक्य नीतीनुसार, जर एखाद्या पालकाची मुले खोटे बोलत असतील तर अशा पालकांनी ताबडतोब सावध झाले पाहिजे. अशा वेळी मुलांना प्रेमाने समजावले पाहिजे. मुलांनी खरे बोलले पाहिजे आणि या दिशेने काम केले पाहिजे.
- जेव्हा मुले तुमचे ऐकत नाहीत
मुलांचा स्वभाव खेळकर आणि खोडकर असतो. अशा स्थितीत अनेकवेळा त्यांना बरोबर चूक कळत नाही. मुलांना योग्य आणि अयोग्य याचा अर्थ शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. जर मुले तुमचे बोलणे ऐकत नसतील तर तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगावे आणि त्यांची ही सवय दूर करण्याचा प्रयत्न करावा.
चाणक्याच्या मते मुलांना महापुरुषांच्या कथा सांगाव्यात. कारण मुले कथा फार लक्षपूर्वक ऐकतात. अशा वेळी मुलं जेव्हा महापुरुषांच्या कथा ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात चांगले विचार रुजतात. ते महापुरुषांच्या जीवनातून प्रेरित होऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतील.
या गोष्टी लक्षात ठेवा
मुलांचे हृदय कोमल असते. ते नक्कीच खोडकर आहेत. जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट सवय निर्माण होत असेल तर तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगावे. आपण मुलांवर कधीही हात उचलू नये. चाणक्यांच्या मते लहान मुले ही कच्च्या मातीसारखी असतात. त्यांना दिशा देण्याचे पहिले काम हे पालकांचे असते. लहानपणापासूनच मुलाला चांगले संस्कार दिले जातात. पालकांनी सुरुवातीपासूनच जागरूक राहून आपले कर्तव्य बजावले, तरच मूल योग्य होईल. यासाठी मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांना सुरुवातीपासूनच चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.