सरकारने अर्थसंकल्पात शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३८,८०० नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त अजून अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करेल. साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात असे त्या म्हणाल्या. रोजगाराबाबत मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हे सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकार या अर्थसंकल्पात नोकऱ्यांची घोषणा करून विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे.