इंद्रायणी नदी तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेनिमित्त गंगा आरती
पिंपरी :- खंडप्राय भारतात बहुविध संस्कृतीत विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहाने, भक्ती भावाने साजरे केले जातात. या सण उत्सवात संस्कृतिचे जतन करीत असताना सर्वांनी सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छटपुजा उत्सवानिमित्त इंद्रायणी घाट परिसर स्वच्छता अभियान राबविले जाते. त्याप्रमाणे सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन आपले घर, परिसर, गल्ली, वार्ड स्वच्छ ठेवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल असा विश्वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केला.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर बुधवारी (दि. 30) छटपूजेनिमित्त महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाट परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर शनिवार (दि. 2 नोव्हेंबर) सायंकाळी छट उत्सवानिमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत व विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी घाट परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी स्वत: श्रमदान केले.
यावेळी सल्लागार सुभाष माछरे, निलेश बोराटे, अतुल बोराटे, निखिल बोराडे, मंगेश हिंगणे, योगेश बोराटे, चेतन बोराटे, बबन हिंगणे, नितिन गायकवाड़, आबा घारे, उमेश सिंह, छठ पूजा समिती सदस्य श्यामबाबू गुप्ता, विनोद प्रसाद, मुन्ना सिंह, उमेश सिंह, किरण गायकवाड़, पृथ्वी प्रसाद, ब्रिजेश प्रजापती, रोहित प्रसाद, विकास गुप्ता, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, राहुल गुप्ता, प्रकाश कांबळे, विवेक भुजबळ, पप्पू गुप्ता, डॉ.पंकज गुप्ता, सत्यम गुप्ता, आदित्य गुप्ता आदि उपस्थित होते.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मागील वर्षीप्रमाणे मोशीतील इंद्रायणी घाटावर छटपूजेनिमित्त शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) सायंकाळी 4.30 वाजता आणि रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजता भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी (दि.31 ऑक्टोबर) सुर्यषष्टी महाव्रत आरंभ महापूजा, शुक्रवारी (दि. 1 नोव्हेंबर) छोटकी छट, शनिवारी (दि.2 नोव्हेंबर) सायंकाळी 5.30 वाजता सूर्यास्तावेळी सायंकाळी 6.02 मिनिटांनी भव्य गंगा आरती आणि रविवारी (दि.3 नोव्हेंबर) पहाटे 6.35 वाजता सुर्योदयावेळी भव्य गंगाआरती होणार आहे. तसेच या निमित्त विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
छटपूजेचे महत्व सांगताना लालाबाबू गुप्ता म्हणाले की, सूर्याची उपासना करण्यासाठी छटपुजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचिन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.