Chaupher News
छत्रपती शिवाजी महाराज यांचं संघटन कौशल्य आणि माणसांची पारख व रणनीती याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुग्राम येथे पोलीस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि कौशल्य तसंच तंत्रज्ञान हे पोलीस खात्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा असंही डोवाल यांनी स्पष्ट केलं.
” पोलीस आधुनिक होणं म्हणजे ते टेक्नोसॅव्ही होणं एवढाच नाही. तर हे तंत्रज्ञान पोलीस खात्यातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहचवायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा हा कळीचा मुद्दा आहे. एका चांगल्या नेत्यामध्ये हेच नेतृत्वगुण असले पाहिजेत. तरच प्रत्येक व्यक्तीतील क्षमतेचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो आणि अगदी शेवटच्या माणसालाही त्या नेत्याचे महत्त्व कळतं. ” असं डोवाल यांनी म्हटलं आहे.