चौफेरन्यूज –शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे असे महामानव डॉक्टर आंबेडकर सांगतात. पण कोरोना या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली आहे. मुलांमध्ये चंचलता, आक्रमकपणा वाढला असून एकाग्रता खूप कमी झाली आहे. पूर्वी शिकलेल्या विषयातील आशय विसरला आहे एका जागी बसणे, अभ्यास करणे याची इच्छाच होत नाही. आकलनासह वाचन, लेखन या क्षमताही कमी झाल्याचे जाणवत आहे. प्रचिती स्कूल व सर्व शिक्षकांनी ही जबाबदारी घेतलीच आहे पण त्यापेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे. मुलांची शैक्षणिक गाडी रुळावर आणणे हीच आपली प्राथमिकता ठेवण्यासाठी, आपल्या मुलांच्या शैक्षणिक तयारीकडे प्रत्येक पालकांचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांचा पाठ्यपुस्तकाशी सुद्धा फार आणि सततचा संपर्क कमी झाला आहे मग मुलांना शिकायला कसं प्रवृत्त करायचं त्यासाठी काही गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजे.
कोणत्याही राष्ट्राच्या व समाजाचा विकास हा ध्येयवेड्या व्यक्तींमुळे होत असतो हे त्रिवार सत्य आहे. मुलांना शिक्षण मिळावे, त्यांची उन्नती व्हावी, या छोट्या कळ्या खुलाव्यात, फुलाव्यात, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सुवास दशदिशांना पसरावा या ध्येयाने प्रेरित झालेले सेवाभावी वृत्तीचे चेअरमन मा.श्री प्रशांत पाटील त्याचबरोबर प्राचार्या पंजाबी मॅडम, उपप्राचार्या लाडे मॅडम, समन्वयक श्री. वैभव सोनवणे, श्री. तुषार देवरे तसेच सर्व शिक्षकांनी मुलं अभ्यासात मागं पडलीत त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून समर्थ सिंग यांच्या परिसंवादाचे दि.१ ऑक्टो रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजन केले.
बुद्धिमत्ता, सखोल ज्ञान, अथक परिश्रम आणि निर्धार याचा एक अद्वितीय मिश्रण म्हणजे श्री समर्थ सिंग सर.
खरोखर मेंदूला चालना देणारे भांडार पालकांसमोर त्यांनी रिते केले.अभ्यासाच्या वेगवेगळ्या युक्त्या सरांनी पालकांसमोर मांडल्या
त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर परिसंवादात आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढावी, यशस्वी होण्याचे अविश्वसनीय मार्ग कोणते, मोठ्या आणि कठीण प्रश्नांची उत्तरे कशी पटकन लक्षात ठेवावीत, पाठ केलेले विसरले तर काय करावे? गणित विषयात आवड कशी निर्माण करावी? विद्यार्थी व पालकांच्या विश्वास पूर्ण नात्यावर आधारित सखोल परिसंवाद साधला.