चौफेर न्यूज – संसदेच्या स्थायी समितीने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शालेय पुस्तकांमध्ये सर्व धर्मातील महापुरुषांचा समावेश करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, धार्मिक शिकवणीमुळे मुलांना त्यांच्या धर्माची आणि संस्कृतीची माहिती मिळते. ही समिती शिक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदेची स्थायी समिती आहे. जिने केंद्र सरकारला अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केली आहे.
शाळेतून मिळेल धर्माचे ज्ञान
समितीने शिफारस केली आहे की, NCERT आणि SCERT ने शालेय अभ्यासक्रमात वेद आणि इतर प्राचीन ग्रंथांशी संबंधित शिक्षण आणि ज्ञान समाविष्ट करावे. यातून मुलांना जीवन आणि समाजाशी संबंधित शिक्षण मिळेल, असे समितीचे म्हणणे आहे. या शिफारशी अशा वेळी करण्यात आल्या आहेत, जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या संयुक्त विद्यमाने शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येत आहेत. तसेच याच्या फ्रेमवर्कमध्ये देखील सुधारणा करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती
समितीने अशीही मागणी केली की, आतापर्यंत माहित नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समान महत्त्व देऊन समावेश करावा, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला एनसीईआरटीच्या सहकार्याने आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.