चौफेर न्यूज – करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग येत्या 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परवानगी व मान्यता दिली आहे. शासनाकडून आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत. ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहीम राबविण्याचे आदेशही शासनाने बजावले आहेत.
शाळा सुरू
करण्याबाबत
राज्य
शैक्षणिक
संशोधन
व
प्रशिक्षण
परिषदेने
पालकांचे
ऑनलाइन
सर्वेक्षणही
घेतले
होते.
यात
81.18 टक्के पालकांनी
मुलांना
शाळेत
पाठवण्याची
तयारी
दर्शविली
आहे.
करोनाचा
प्रादुर्भाव
आता
कमी
झाला
असल्याने
व
निर्बंधही
शिथिल
झाले
आहेत.
त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील वर्ग सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी जुलैमध्ये करोनामुक्त ग्रामीण भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
मुुंबई, मुंबई उपनगर, ठाण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त, तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी घेणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी लागणार आहे. यात वॉर्ड ऑफिसर, महापालिका वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांचा समावेश असणार आहे.
नगरपंचायत, नगरपालिकाम ग्रामंपचायत स्तरावर शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करणार आहे. यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे.
शाळा सुरू करण्याची नियमावली
- सकाळ, दुपार या दोन सत्रांत शाळा भरणार
- वर्गातील एका
- बाकावर एकच
- विद्यार्थी बसणार
- दोन बाकांमध्ये
- किमान सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक
- शिक्षकांचे लसीकरण बंधनकारक
- शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटी-पीएसीआर चाचणी आवश्यक
- विद्यार्थ्याला शाळेत नेण्यासाठी पालकांची संमती घेणे गरजेचे
- परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर गर्दीच्या कार्यक्रमांवर कडक निर्बंध
- शिक्षक व पालक बैठका ऑनलाइनच घ्याव्या लागणार
- कोणत्याही कारणास्तव पालकांना शाळा परिसरात येण्यास बंदी