आमळी : साक्री तालुक्यातील आमळी येथे विद्युत ट्रान्सफार्मरची अडचण अद्यापही सुटलेली नाही. आठ दिवसांपासून शेतकरी त्रस्त झाले आहेत.
एकाच ट्रान्सफार्मरवरील वापर वाढल्याने वीज प्रवाह सुरळीत होत नाही. परिणामी, वारंवार ट्रान्सफार्मर जळण्याच्या घटना घडत आहेत. या परिसरात प्रशासनाने एक ऐवजी दोन ट्रान्सफार्मर बसविणे गरजेचे असतांना दुर्लक्ष होत आहे. कांदे, गहू, हरभरा इत्यादी पिकांना चांगलीच झळ सोसावी लागते आहे. तरी प्रशासनाने त्वरित दोन ट्रान्सफार्मर बसवावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.