महापुरुषांच्या वेशभुषा साकारून विद्यार्थ्यांनी दिला स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना उजाळा
चौफेर न्यूज : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देश स्वातंत्र्यासाठी झटणा-या विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारून स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया यांच्या हस्ते सरस्वती व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. यावेळी, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे, उपप्राचार्या मालविका चक्रवती, व्यवस्थापक तुषार देवरे, संयोजक वैभव सोनवणे, सपना देवरे, जितेंद्र राजपूत यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी- पालक आदी उपस्थित होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
आठवीच्या विद्यार्थिनी समृद्धी देवरे, अवनी पवार यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी भाषणे दिली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मार्चपास सादर केले. शिक्षक तुषार सूर्यवंशी, श्रीम. मनीषा यांनी मार्गदर्शन केले. मृणाल बेडसे (इयत्ता नववी), श्रद्धा भामरे (इयत्ता आठवी), सायली पवार (इयत्ता सातवी), प्रतीक जैन (इयत्ता सहावी), निहारिका बोरसे (इयत्ता चौथी), हरिता अहिरराव (इयत्ता सातवी) यांनी देखील भाषणे केली. प्रसंगी, श्रावण सरणे यांनी स्वातंत्र्य देशाच्या तिरंगाबद्दल माहिती दिली. जालियनवाला बाग हत्याकांड आणि संविधानाबद्दल मुख्याध्यापिका वैशाली लाडे यांनी माहिती दिली. जोशीला पगारिया यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चिमुकल्यांनी साकारली महापुरुषांची वेशभुषा…
यावेळी एलकेजी, यूकेजी, प्रथम श्रेणीतील विद्यार्थी चिमुकल्यांनी स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आदी महापुरुषांच्या वेशभूषा साकारून जयघोष केला. तेजस्विनी घरटे, हिमांगी गावंडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
लेझीम नृत्य, घुंगरू काठीचे सादरीकरण…..
इयत्ता पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘देश रंगीला रंगीला’ या गाण्यावर लेझीम नृत्य तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या गाण्यावर घुंगरू काठी सादर केली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “सुनो गौर से दुनिया वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यास पूनम पवार, श्रवण सर यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानावर आधारित नाटक सादर केले, त्याला रोहिणी मॅडम आणि जागृती मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्वेता सोनवणे यांनी ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे देशभक्तीपर गीत गायले आहे. यावेळी सुंदर फलक लेखन व रांगोळी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे, जितेंद्र राजपूत यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, चालक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.