दिवाळीचा फराळ व कपडे वाटप करून म्हसदी लोकांची दिवाळी गोड
पिंपळनेर – मंगलमय वातावारणात लक्ष्मीची मुहुर्तावरची पूजा.. व्यापाऱ्यांकडे वह्य़ांचे पूजन, नवीन वस्तूंची खरेदी, मिठाई वाटप.. फटाक्यांची मनमुराद आतषबाजी.. एकमेकांना शुभेच्छा व फराळाचा आस्वाद.. अशा आल्हाददायी वातावरणात प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे गुरुवार दि. २४ रोजी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसेच, दिवाळी निमीत्ताने शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांच्यातर्फे पिंपळनेर जवळील म्हसदी या गावी गरजू लोकांना दिवाळीचा फराळ व कपडे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते, अशी माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे यांनी सांगितले. समन्वयक राहुल पाटील यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजा, भाऊबीजचे महत्त्व सांगण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षीका आश्विनी पगार यांनी केले. दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस या दिवसाची माहिती भाग्यश्री घरटे यांनी दिली. दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवसाची माहिती निलीमा मॅडम यांनी सांगितले. यावेळी, धनलक्ष्मी प्रतिमा पूजन करण्यात आले. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतूर्दशी या दिवसाची माहिती अनिता पाटील यांनी दिली. नरकासूराचा वधाची माहिती नाट्यरुपी मांडण्यात आली. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन या दिवसाची महत्त्व आश्विनी पगार यांनी सांगितले. दिवाळीचा पाचवा दिवस दिवाळी पाडवा या दिवसाची माहिती पल्लवी मोरे यांनी सांगितली. वामन अवतार दाखवून अभ्यंगस्थान दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांपैकी अनुष्का पाटील हिने सिता तर लक्ष्मीकांत साबळे याने राम हे वनवासातून परततांनाचे नाट्य सादर केले. भाऊबिजेची माहिती आश्विनी मोरे यांनी सांगितली. तसेच, बहीण भावाला ओवाळण्याचा कार्यक्रम झाला.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात, अशी माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या, समन्वयक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी, स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांनी सर्व विद्यार्थी – शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.