सभासद, संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी यांची सांघिक कार्यपद्धती ही सहकारात महत्त्वाची असते, ही संघभावना प्रेरणा बँकेत प्रामुख्याने आढळते, म्हणूनच बँकेने अल्पावधीत मोठी भरारी घेतली आहे, सहकारी बँकांचे अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे. कारण तळागाळातील लोकांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग हा फक्त सहकारी बँकांच्या माध्यमातूनच निर्माण झाला. गरिबातल्या गरीब व्यक्तीचा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्याचे प्रमुख कार्य सहकारी बँकांनीच केले. सामाजिक बँकिंग ही कल्पना सहकारी बँकांमुळेच पुढे आली. असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. ते थेरगाव येथे प्रेरणा को – ऑप. बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन नानासाहेब नवले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन सुरेश पारखी, संस्थापक तुकाराम गुजर, संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, संजय पठारे, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, सी.ए.नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड. अजितकुमार जाधव, राजाराम रंदिल, राजेंद्र शिरसाठ, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते क्यू आर कोड व लोगोचे अनावरण करण्यात आले. बँकेच्या स्थापनेपासून २४ वर्षांच्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सभासद, ठेवीदार व खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रेरणा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नामदेव कस्पटे, सुखदेव बुचडे, शिवराम पवार, विठ्ठल साखरे, स्वप्निल काटे, प्रभाकर गुजर, बाळासाहेब हुलावळे, रामदास वाल्हेकर, नारायण मानकर, प्रल्हाद जांभूळकर, बाळू नवले, भिवाजी बारणे, सागर मुऱ्हे, खंडू मोरे, संदिप नेवाळे भरत कड, दिपाली तापकीर, मच्छिंद्र गवळी, पंढरीनाथ भोसले, राजाराम भुजबळ, रोहिदास भालेकर, किसन जगताप, संदिप गायकवाड,संदिप गाडे, सोमनाथ बेलदरे यांचा समावेश होता.
अनास्कर पुढे म्हणाले, संचालक मंडळाने विश्वस्तांच्या भूमिकेतून सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि खातेदार यांना योग्य ती सेवा देणाऱ्या बँकाच देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावू शकतात. प्रेरणा बँकेने आजपर्यंत विश्वासार्हता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांना उत्तम सेवासुविधा पुरवणारी बँक अशीच ओळख निर्माण केली आहे.
नानासाहेब नवले म्हणाले, समाजातील शेवटचा घटक अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात यावा, त्याला समाज जीवनात उभे राहता यावे यासाठी सातत्याने प्रेरणा बँक कार्य करत आहे. सहकार्य हा संस्कार आहे, त्यासाठी असणारी सहकाराची गरज ओळखून तुकाराम गुजर यांनी स्थापन केलेली प्रेरणा बँक ही एक आदर्श बँक आहे. २४ वर्षांच्या कालावधीत बँकेने दिलेली सेवा, सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर यामुळे बँकेची वाटचाल आदर्शवत आहे. सक्षम नेतृत्व असणारे चेअरमन कांतीलाल गुजर, अभ्यासू संचालक मंडळ आणि उत्कृष्ट सेवा देणारे कर्मचारी वर्ग यामुळे सभासद, खातेदार यांच्या मनात बँकेने विश्वास निर्माण केला आहे.
बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर प्रास्ताविकात यांनी रोप्य महोत्सवी वर्षासाठी २५ महिने २५ दिवसांसाठी सर्व सभासदांकरिता ७.२५ % टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांकरता ७.५० % व्याजदर ही नवी ठेव योजना जाहीर केली. ते म्हणाले, रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अनेक संकल्प, योजना मनात आहेत. वर्षभर ग्राहक, सभासद यांच्यासाठी अनेक उपक्रम बँकेमार्फत राबविले जाणार आहेत सध्या बँकेच्या १५ शाखा असून आजपर्यंत बँकेने ६०० कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण केला आहे. १००० कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून बँकेच्या यशस्वी वाटचालीत सर्व संचालक मंडळ, ठेवीदार,भागधारक,खातेदार व कर्मचारी यांचे विशेष योगदान आहे.
सूत्रसंचालन नाना शिवले व संचिता जगताप यांनी केले. आभार श्रीधर वाल्हेकर यांनी मानले.
कृपया सदर बातमी आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी ही विनंती.