चौफेर न्यूज – आगामी होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परिक्षांबाबत मोठे बदल करण्यात आले आहे. एसएससी आणि एचएससी म्हणजेच दाहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. परिक्षा पध्दती, परिक्षेचा कालावधी, परिक्षा केंद्र याबाबत विशेष फेरबदल केले होते. म्हणजेचं २०२१ आणि २०२२ या कालावधीत एसएससी आणि एचएससी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास म्हणजे अडीच तासाच्या ऐवजी तीन तास कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी दिला जाणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर आता फक्त अडीच तासात सोडवावा लागणार आहे.
2023 मध्ये होणाऱ्या एचएससी आणि एसएससी परिक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहेत. दहावी बारावीच्या २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अलॉट केलेल्या सेंटरवर जावून परिक्षा द्यावी लागणार आहे.