साक्री तालुक्यात प्रचिती स्कूल ठरली अव्वल ; संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी केले शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक…
साक्री : साक्री तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल या एकमेव सीबीएसई मान्यताप्राप्त संस्थेचा १० वी सीबीएसई परिक्षेचा १०० टक्के निकाल जाहीर झाला आहे. स्कूलमधील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली. यामध्ये, सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन करून शाळेस नावलौकिक मिळवून दिले आहे. या निकालाबददल संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील व प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) परिक्षेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमधील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई अफिलीटेड क्रमांक मिळाला असून ही शाळा साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पहिली मान्यताप्राप्त शाळा बनली आहे. साक्री तालुक्यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूल एकमेक सीबीएससी पॅटर्न राबविणारी शाळा आहे. शासनाची ध्येय धोरणे शाळेकडून पाळले जातात. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या क्रीडा गुणांना चालणा देण्याचे काम शाळेमार्फत सूरू आहे. शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धा असो शालेय अंतर्गत स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेण्यात येथील शिक्षक नेहमीच पुढाकार घेतात. त्यामुळे बौद्धिक ज्ञानासह मुलांना खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यात मदत होते, अशी प्रतिक्रिया देत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण व्यवस्था उत्तम स्वरुपाची आहे. येथील शिक्षक वर्गाकडे विद्येचा भांडार असल्याने मुलांना आकलन होण्यात सोपे जाते. शाळेचे व्यवस्थापन उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडत असून एकाही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असते, असे म्हणत निकाल जाहीर झाल्यानंतर प्राचार्या वैशाली लाडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीची परीक्षा 5 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाली होती. या परीक्षेसाठी 21,86,940 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.