चौफेर न्यूज – गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे.
ठळक मुद्दे
* इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.
* प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे.
* विद्यार्थ्यांनी नापास झालेल्या विषयांत १२० दिवसांत परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
मुंबई अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. प्रथम आणि | द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी | गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नापास झालेल्या विषयांत १२० दिवसांत परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांचाही विचार करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे, मात्र त्यांना ही पुढील वर्षाच्या १२० दिवसांत
आधीच्या एटीकेटी क्लीअर कराव्या लागणार आहेत. यासाठी ५० टक्के मागील वर्षीचा परफॉर्मन्स आणि ५० टक्के सध्याच्या सत्रातील परफॉर्मन्स लक्षात घेऊन श्रेणी दिली जाईल, गुण दिले जातील आणि पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल.