चौफेर न्यूज – राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी बारावी निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे.
राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल :
कोकण – 95.89 टक्के, पुणे – 92.50 टक्के, कोल्हापूर – 92.42 टक्के, अमरावती – 92.09 टक्के, नागपूर – 91.65 टक्के, लातूर – 89.79 टक्के, मुंबई – 89.35 टक्के, नाशिक – 88.87 टक्के, औरंगाबाद – 88.18 टक्के