चौफेर न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (एमपीसी) पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. परीक्षेचे पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच शेअर केले जाईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं. यावर आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचना आल्यानंतर आपल्याला राज्यात शाळा सुरू कराव्या लागणार आहे. मात्र अजून तसा काही निर्णय आलेला नाही.
मात्र त्यांनी पुढे माहिती दिली की, पहिल्यांदा इयत्ता दहावीची शाळा सुरू करावी आणि नंतर बाकी वर्ग सुरू करावे असा विचार आहे. पण केद्र सरकारने गाईड लाईन स्पष्ट कराव्यात. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
ऑक्टोबर महिन्यात नापास विद्यार्थ्यांची १० आणि १२वीची परीक्षा घेण्यात येणार आहे. पण या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या परिक्षा सध्याची परिस्थितीत घ्यायची की नाही याचाही विचार करावा लागणार आहे.तर महत्त्वाचं म्हणजे यासाठी ऑनलाईल परीक्षा घेता येणार नाहीत. त्याला पर्याय म्हणून विविध काय उपलब्ध करून देता येईल का, याची चाचपणी सरकार करत आहे.