चौफेर न्यूज
– कोरोना संक्रमना काळात जेईई व नीट परीक्षा आयोजित केली जात असल्याने केंद्र सरकारवर टीका होत आहे. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
एका वेळी नोंदणी डेक्सवर जास्तीत जास्त १५ विद्यार्थीच असतील. या व्यतिरिक्त परीक्षा केंद्राच्या आत जाऊन बाहेर येण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्पर्शविहीन असेल. कागदपत्रांची तपासणीदेखील स्पर्शविहीन असेल ‘आम्ही परीक्षेच्या आधी आणि नंतरची सर्व व्यवस्था चोख केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा दिल्या आहेत. एका केंद्रावर १५० विद्यार्थीच असतील. त्यांचे विविध गट बनवले आहेत आणि ते ३० ते ४० मिनिटांच्या अंतराने परीक्षा केंद्रावर पोहोचतील याची व्यवस्था केली आहे.
गेटवर एक क्यू मॅनेजर असेल जो सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी करेल. स्थानिक प्रशासन, अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. परीक्षा संपल्यावरदेखील विद्यार्थी गटागटाने बाहेर पडतील, जेणेकरून गर्दी होणार नाही. दरम्यान, जेईई मेनसाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
आधी ५७० परीक्षा केंद्रे होती, ती आता ६६० करण्यात आल आहे. आधी प्रति सत्र १ लाख ३२ हजार विद्यार्थी देशभरात या परीक्षेला एका वेळी बसवण्यात येणार होते. ही संख्या आता कमी करून ८० हजारांवर आणण्यात आली आहे. परिणामी सत्रांची संख्या ८ वरून १२ पर्यंत वाढवण्यात आली आहे, असी माहितीही एनटीएने दिली