चौफेर न्यूज – विद्यापीठ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आता परीक्षेवरून अन्य चर्चा न करता त्या कशा पद्धतीने घेता येतील, यादृष्टीने विचार व्हायला हवा. शासन, विद्यापीठ, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक या सर्व घटकांनी एकत्र येत परीक्षा लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्याची तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. आता जास्त कालावधी न घेता राज्य सरकारने परीक्षा कधी घ्यायचा, याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, हीच अपेक्षा.