चौफेर न्यूज – कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. सुरुवातील राज्य सरकारने 9वी चे 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता 5 वी ते 8 वीचे वर्ग देखील सुरू होत आहेत.
शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत आहे.
चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आता कधी सुरू होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 5 वी ते 8 वीच्या वर्गांचा टप्पा यशस्वी झाल्यानंतरच चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू, असे म्हटले आहे.
पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करू, अशी माहिती वर्षा गायकवाड यांन दिली. तसेच, पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.