चौफेर न्यूज – कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्यातील शाळा मागील दहा महिन्यांहून अधिक काळ बंद होत्या. या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. याच पार्श्वभुमीवर आजापासून पुण्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु झाले असून शाळेत खुप दिवसांनी परतलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्यातील शाळा मागील दहा महिन्यांहून अधिक काळ बंद होत्या. या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. याच पार्श्वभुमीवर आजापासून पुण्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु झाले असून शाळेत खुप दिवसांनी परतलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यभर ५ वी ते ८वीचे वर्ग देखील सुरू झाले आहेत. परंतु शिक्षकांना त्यांचे आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट्स देखील निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये आता १ली ते ४ थी चे वर्ग देखील सुरू करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. परंतु मुंबई मध्ये मात्र अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत.